Rajanand More
भारताने दहशतवादाविरोधात पुकारलेल्या ऑपरेशन सिंदूरला मोठे यश मिळाले आहे. भारतीय लष्कराने पाकचे कंबरडे मोडले आहे.
दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधीचा निर्णय झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी (ता. 13) देशवासियांना संबोधित केले. त्यांनी पाकिस्तानला दहशतवाद थांबवला नाही तर पुन्हा हल्ला करण्याचा सूचक इशारा दिला आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्ये सर्वात मोलाची भूमिका ठरली ती हवाई दलाची. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी मंगळवारी सकाळीच हवाई दलाचा एअरबेस गाठला.
पंतप्रधानांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला पसंती दिली. याठिकाणी सकाळीच जात त्यांनी तेथील पायलट, इतर अधिकारी, जवानांशी संवाद साधला.
एअरबेसला पंतप्रधानांनी भेट दिल्याने येथील जवानांमध्ये आनंद पसरला होता. याबाबतचे फोटो पंतप्रधानांनी सोशल मीडियात पोस्ट केले होते.
हे एअरबेस पाकिस्तानच्या हल्ल्यात उध्वस्त झाल्याचा खोटा प्रचार करण्यात आला होता. भारतीय हवाईदलाने यापूर्वीच पाकचा दावा खोडून काढला होता.
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेसलाच भेट देत खोटा दावा करणाऱ्या पाकची पोलखोल केली आहे. पंतप्रधान मोदींचे विमानही या एअरबेसवर उतरले.
आदमपूर हे हवाई तळ मिग 29 या लढाऊ विमानांचे तळ आहे. पाकिस्तानी सीमेजवळच हे एअरबेस असल्याने पाकिस्तानसाठी नेहमीच डोळ्यात खुपणारे ठरले आहे. या एअरबेसवर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला होता.