Rashmi Mane
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत पाकिस्तान मधील तणाव वाढत चालला आहे.
जर युद्ध झाले तर "Act of War" म्हणजे युद्धाची कृती किंवा युद्ध घोषित करण्यासारखी घटना. याचा वापर आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एखाद्या देशाने दुसऱ्या देशावर केलेल्या आक्रमक कृतीसाठी केला जातो, ज्यामुळे युद्ध सुरू होऊ शकते.
दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 पर्यंत चालले, ज्यामध्ये 5 कोटींहून अधिक लोक मृत्युमुखी पडले. या युद्धात पहिल्यांदाच अणुबॉम्बचा वापर करण्यात आला. या अणुबॉब्मचा विध्वंस इतका प्रचंड होता की जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी 1949 मध्ये जिनिव्हा करारानुसार युद्धाचे नियम तयार करण्यासाठी एकत्र आले.
या नियमांमध्ये युद्ध कसे लढले जाईल आणि युद्धात कोणावर हल्ला केला जाऊ शकतो हे सांगितले होते. युद्धात कोणती शस्त्रे वापरली जातील आणि कोणत्या गोष्टींना लक्ष्य केले जाईल. याला युद्धाचा नियम म्हणतात.
या अधिवेशनादरम्यान 161 नियम बनवण्यात आले आहेत आणि त्यांना 161 देशांनी मान्यता दिली आहे. हे सर्व देश या नियमांचे पालन करण्यास बांधील आहेत. हे नियम फक्त तेव्हाच लागू होतील जेव्हा दोन किंवा अधिक देशांमध्ये शस्त्रास्त्रांनी युद्ध लढले जात असेल.
युद्ध कायद्यात स्पष्टपणे लिहिले आहे की युद्धादरम्यान सामान्य नागरिकांना लक्ष्य केले जाऊ शकत नाही. याशिवाय पत्रकार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकत नाही.
निवासी क्षेत्रे, शाळा, महाविद्यालये, सामान्य घरे, इमारती, रुग्णालये आणि वैद्यकीय युनिट्सवर देखील हल्ला करता येणार नाही.
कोणताही देश दुसऱ्या देशावर इशारा दिल्याशिवाय हल्ला करू शकत नाही. युद्धग्रस्त भागातील लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारीही देशाची आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांना तिथून जाण्यापासून रोखता येणार नाही.