Roshan More
नव्या संसदभवनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले. या अभिभाषणातून त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचे रिपोट कार्ड मांडले. राष्ट्रपतींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...
देश वेगाने विकास करत असून गेल्या तिमाहींमध्ये भारताचा विकास दर 7.5 टक्क्यांवर पोहोचला आहे.
गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आहे. शिवाय भारताच्या उत्पादनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
'मेरी माटी मेरा देश' या अभियानातून देशातील प्रत्येक गावातील माती एका कलशात भरून दिल्लीत आणली गेली.
भारताची चंद्रयान मोहीम यशस्वी ठरली. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला.
राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनंतर पाच दिवसांत 13 लाख भाविकांनी भेट दिली.
मागील 40 वर्षांची मागणी असलेली वन रँक वन पेन्शन योजना लागू केली.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये भारताची अर्थव्यवस्था पोहोचली आहे.
विश्वमित्र बनला भारत
मागील तीन वर्षांमध्ये जागतिक स्तरावर मोठ्या घडमोडी घडल्या. या कठीण काळात भारताने स्वतःला विश्वमित्र म्हणून स्थापित केले.