Pradeep Pendhare
बेरोजगारांना विविध कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार संधी निर्माण करण्यासाठी पंतप्रधान इंटर्नशिप योजना सुरू करण्यात आली.
या योजनेत सहभागी होण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च होती.
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट मंत्रालयाने सुरू केलेल्या या योजनेनुसार एकूण 18 प्रकारच्या क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते.
केंद्र सरकारने यासाठी 500 कंपन्यांसोबत करार करण्यात आला, असून प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला वर्षभरात 66 हजार रुपये पाठ्यवृत्ती मिळते.
प्रशिक्षण सुरू असलेल्या कंपनीकडून 500 रुपये, तर 4 हजार 500 रुपये केंद्र सरकारचे, असे एकूण महिन्याला पाच हजार रुपये दिले जातात.
आकस्मिक निधी म्हणून वर्षाला सहा हजार रुपये देत, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना आणि पंतप्रधान सुरक्षा विमा योजना देखील लागू आहे.
अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाखांपेक्षा जास्त नसावे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा.
पूर्णवेळ विद्यार्थी किंवा नोकरदार नसावा, तसेच वय 21 ते 24 असावे, अशा या योजनेच्या अटी आहेत.
दहावी, बारावी, पदवी, डिप्लोमा, आयटीआय किंवा बीए, बीकॉम, तत्सम शिक्षण उत्तीर्ण. परंतु बेरोजगार या योजनेसाठी पात्र असेल.