Roshan More
केरळ राज्यातील काँग्रेसचे खासदार कोडीकुन्नील सुरेश यांनी यंदा आठव्यांदा लोकसभेत विजयी होण्याच्या विक्रम केला आहे.
लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी कोडीकुन्नील सुरेश यांचे नाव चर्चेत होते. सुरेश यांना हंगामी अध्यक्ष करण्याची मागणी काँग्रेसने केली होती.
सुरेश हे दलित असल्याने त्यांना हंगामी अध्यक्ष भाजपने केले नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रतिस्पर्धी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केला.
सुरेश सलग आठ वेळा विजयी झाले नाहीत. 1998 आणि 2004 मध्ये त्यांचा विजय खंडित झाला. त्यामुळे त्यांना हंगामी अध्यक्ष केले नाही, असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
सुरेश हे पहिल्यांदा 1989 मध्ये लोकसभेवर निवडून आले होते.
2009 मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारमध्ये सुरेश हे केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुरेश यांनी सीपीआयच्या सी ए अरुण कुमार यांचा 10 हजार मतांनी पराभव केला.