Aslam Shanedivan
महात्मा फुले यांच्या जयंती द्विशताब्दी वर्षाच्या औचित्याने महात्मा जोतिबा फुले यांचे मूळ गाव असलेल्या पुरंदर जवळील खानवडी येथे राज्यातील पहिल्या जिल्हा परिषदेच्या सीबीएसई शाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, वंचित विद्यार्थ्यांना दर्जेदार इंग्रजी माध्यमाचे सीबीएसई अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहे.
सुमारे १२ एकर परिसरातील या आधुनिक शाळेत ज्युनिअर केजी ते १२ वीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे.
येथे सीबीएसई अभ्यासक्रमासोबतच डिजिटल शिक्षण, सुसज्ज प्रयोगशाळा, आधुनिक ग्रंथालय आणि क्रीडा सुविधा उपलब्ध
शिक्षण, महिला सक्षमीकरण, सामाजिक समता आणि आधुनिक तंत्रज्ञान यावर भर देत एआय लॅब, अटल टिंकरिंग लॅब, परदेशी भाषा शिक्षण मिळणार आहे.
केजी ते इयत्ता २ रीपर्यंतचे वर्ग २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार. आतापर्यंत सुमारे २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इतर वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
पुढील वर्षापासून इयत्ता ६ वीपासून निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ४० विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करण्यात येणार आहे.
दरम्यान आता ही शाळा पूर्णत्वाकडे गेली शैक्षणिक वर्षही सुरू होणार आहे. तर या शाळेचे भूमिपूजन 9 मे 2022 रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले होते.