ऑगस्ट क्रांती! 83 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच गांधीजींच्या नेतृत्वात लाखो भारतीयांनी ब्रिटिशांना देश सोडण्याचं दिलं होतं आव्हान

Jagdish Patil

भारत छोडो आंदोलन

भारत छोडो आंदोलनाला शुक्रवारी (ता.09) 83 वर्षे पूर्ण झाली. ब्रिटिशांना देशातून हाकलून लावण्यासाठी करण्यात आलेले हे शेवटचे आंदोलन ठरले.

Quit India Movement Anniversary

ऑगस्ट क्रांती

भारत छोडो आंदोलनाला "ऑगस्ट क्रांती" आंदोलन असंही म्हणतात. ते महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात मुंबईतील एका मैदानातून 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झालं होतं.

Quit India Movement Anniversary

करो या मरो

यावेळी गांधीजींनी 'करो या मरो' असा नारा देत तरुणांना ब्रिटिशांना देशातून हाकलण्याचं आवाहन केलं. या आंदोलनात महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.

Quit India Movement Anniversary

इतिहास

ब्रिटिशांनी भारत सोडला नाही तर त्यांच्याविरुद्ध देशव्यापी सविनय कायदेभंग करण्याचा ठराव 4 जुलै 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मंजूर केला.

Quit India Movement Anniversary

मागणी

भारताची मागणी होती की ब्रिटनने भारताला अहिंसक पद्धतीने युद्धाविरुद्ध प्रचार करण्यास स्वातंत्र्य असल्याचं घोषित करावं. तरच सविनय कायदेभंग आंदोलन होणार नाही.

Quit India Movement Anniversary

काँग्रेस पक्षावर बंदी

पण मागणी फेटाळली तर काँग्रेसकडे दुसरा पर्याय नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, ही चळवळ सुरू होताच ब्रिटिशांनी अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करत काँग्रेस पक्षावर बंदी घातली.

Quit India Movement Anniversary | Sarkarnama

संघर्ष

यात एक लाखाहून अधिक लोकांना अटक केली. तर हिंसाचारात शेकडो जणांचा मृत्यू झाला. अनेक राष्ट्रीय नेते भूमिगत झाले पण त्यांनी समांतर सरकार स्थापन करून संघर्ष सुरूच ठेवला.

Quit India Movement Anniversary | Sarkarnama

कस्तुरबा गांधी

काँग्रेस नेतृत्वाने 3 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवला. काही महिन्यांत गांधीजींच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर गांधींची प्रकृतीही ढासळली. तरीही त्यांनी 21 दिवस उपवास केला.

Quit India Movement Anniversary

प्रतिकार

1944 मध्ये, ब्रिटिशांनी गांधीजींना आजारपणामुळे सोडले, परंतु त्यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या सुटकेची मागणी करत प्रतिकार सुरूच ठेवला.

Mahatma Gandhi | Sarkarnama

सुटका

1945 मध्ये दुसरे महायुद्ध संपत आले तेव्हा ब्रिटनच्या लेबर पक्षाने भारताला स्वातंत्र्य देण्याच्या आश्वासनावर निवडणुका जिंकल्या. आणि चळवळीला घाबरलेल्या ब्रिटिशांनी राजकीय कैद्यांची सुटका केली.

Mahatma Gandhi | Sarkarnama

NEXT : ज्या फोटोमुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं, त्या बैठकीचे इनसाईड फोटो राहुल गांधींनी केले शेअर, पाहा कोण कुठे बसलंय?

INDIA Alliance Rahul Gandhi residence meeting | Sarkarnama
क्लिक करा