Sunil Balasaheb Dhumal
रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधींनी भाजपच्या धोरणांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
सत्तेत आल्यानंतर जातीय जनगणना करून आरक्षणाची मर्यादा वाढविणार असल्याची मोठी घोषणा राहुल गांधी यांनी केली.
भारतातील गरीबांची यादी तयार करणार. महिलांच्या खात्यात वर्षाला एक लाख रुपये जमा करणार.
अग्नीवीर योजना रद्द करून सैनिकांना पूर्ववत सर्व सुविधा देणार आहे.
शेतकरी वर्गासाठी कर्ज माफी कमिशन तयार करून गरज असेल तर कर्जमाफी करणार.
गरिबांकडून वसुली करून या सरकारने देशातील फक्त 22 जणांचे खिसे भरल्याचा आरोप राहुल यांनी केला.
मनरेगा योजनेतील लोकांना 400 रुपये रोज दिला जाणार आहे.
तरुणांना डिग्री घेतल्यानंतर लगेच वर्षातच खासगी, पब्लिक, सरकारी क्षेत्रात नोकरी पक्की केली जाणार आहे.