राहुल गांधींनी मित्रपक्षांना दिला 'बुस्टर डोस'; उद्धव ठाकरेंचाही उल्लेख, वाचा दहा महत्वाची विधाने...

Rajanand More

इंडिया आघाडी

इंडिया आघाडीची ८ जूनला दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत २५ पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. त्यांच्या या भाषणातील ठळक दहा मुद्दे पाहूयात. त्यांचे भाषण मित्रपक्षांसाठी बुस्टर डोस असल्याचे मानले जात आहे.

India Alliance | Sarkarnama

प्रतिकाराची गरज

केवळ निवडणुका जिंकण्याची रणनीती पुरेशी नाही. सरकार, भाजपविरोधात देशव्यापी आंदोलनाची गरज असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

Rahul Gandhi | sarkarnama

टीका स्वीकारण्याची तयारी

काँग्रेस किंवा माझ्यावर टीका झाली तरी ती शांतपणे स्वीकारण्याची तयारी असल्याचे सांगत त्यांनी मित्रपक्षांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

नीलकंठ

भगवान शंकराच्या ‘नीलकंठ’ रूपाचा उल्लेख करून काँग्रेस सर्वांना सोबत घेऊन चालत असल्याचा संदेश राहुल गांधी यांनी दिला.

Rahul Gandhi | Sarkarnama

कानही उपटले

सपा, टीएमसी, आरजेडी या पक्षांचे कान उपटताना राहुल म्हणाले, हे पक्ष अजूनही जुन्या राजकीय पद्धतीने विचार करत आहे. केवळ निवडणूक प्रक्रियेवर विसंबून राहून चालणार नाही.

Rahul Gandhi | sarkarnama

मतांची १०० टक्के चोरी

ममता बॅनर्जी यांना निवडणूक चोरी झाल्याचे ९० टक्के वाटत असेल. उद्धव ठाकरे आणि तेजस्वी यादव यांना ४० टक्के चोरी झाल्याचे वाटत असेल. पण देशात १०० टक्के निवडणूक चोरी होत असल्याचा गंभीर आरोपही राहुल यांनी केला.

uddhav thackeray.jpg | sarkarnama

सोशल मिडिया सरकारच्या बाजूने

माझे सोशल मीडियात लाखो फॉलोअर्स आहेत. पण सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म, मीडियातील काही लोकही सरकारच्या बाजूने काम करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

Social Media Ban | Sarkarnama

झुकणार नाही

काँग्रेस पक्ष हा आंदोलनातून निर्माण झालेला ऐतिहासिक पक्ष असून भाजप-आरएसएससमोर कधीच झुकणार नाही, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

Rahul Gandhi | sarkarnama

२०२४ ची निवडणूक जिंकली

आपण २०२४ ची निवडणूक जिंकली आहे. पुढची निवडणूकही आपण जिंकली आहे. लोकांच्या मनात भाजपविरोधात रोष आहे, असा दावाही राहुल यांनी केला.

Rahul Gandhi | Sarkarnama

नितीश कुमारांवर भाष्य

नितीश कुमार सोडून गेले, याला मी किंवा काँग्रेस पक्ष जबाबदार नसल्याचे राहुल यांनी सर्वांसमोर स्पष्ट केले. देशाच्या मुद्यावर डीएमकेही सोबत असल्याचे संकेत त्यांनी दिले.

Nitish Kumar | Sarkarnama

एकजुट

INDIA आघाडीतील निराशा दूर करून सर्वांनी एकजूट ठेवली तर भाजप राज्यागणिक कमकुवत होई, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

India Alliance News | Sarkarnama

NEXT : ममतादीदींच्या राजकीय प्रवासाला कलाटणी देणाऱ्या 5 सर्वात मोठ्या घटना...

येथे क्लिक करा.