Rashmi Mane
रेल्वेत नोकरी करण्याचं स्वप्न अनेक तरुण पाहत असतात. सुरक्षित नोकरी, चांगला पगार आणि उज्वल भविष्य यामुळे रेल्वे भरतीकडे तरुणांचा ओढा असतो. आता अशाच तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या रेल्वे कोच फॅक्टरी (RCF) मध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.
आजच्या स्पर्धात्मक काळात परीक्षेशिवाय सरकारी नोकरी मिळणं ही मोठी संधी आहे. या भरतीत उमेदवारांची निवड थेट शॉर्टलिस्टिंगच्या आधारे होणार असल्याने अनेक तरुणांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिस्ट, पेंटर, कारपेंटर अशा विविध ट्रेडसाठी अप्रेंटिस पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांना त्यांच्या कौशल्यांनुसार काम करण्याची संधी मिळणार आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. ही पात्रता पूर्ण करणारे उमेदवारच अर्ज करू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांचे वय १५ ते २४ वर्षे असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे.
उमेदवारांची निवड १०वी आणि आयटीआय गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग, कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणीद्वारे केली जाणार आहे. कोणतीही लेखी किंवा मुलाखत परीक्षा नाही.
सर्वप्रथम www.rcf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. तिथे नवीन रजिस्ट्रेशन करून आयडी-पासवर्ड तयार करा. नंतर लॉगिन करून संपूर्ण अर्ज भरा.