Mangesh Mahale
पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांना लढाऊ सैन्याचा तुटवडा पडू लागला. त्यावेळी ब्रिटिशांनी हिंदुस्थानातून सैन्यभरती करण्यास सुरुवात केली.
भारतीयांच्या हाती मोठ्या प्रमाणात शस्त्र पडणार होती व त्यांना अत्याधुनिक लष्करी प्रशिक्षण मिळणार होते.
मराठ्यांची लष्करी परंपरा खंडित होऊन बराच कालावधी गेल्यामुळे नेमणुका कमी होऊ लागल्या.
त्यात मराठ्यांच्या शारीरिक ठेवणीमुळे त्यांना लष्करात भरती होण्यास अडचणी येत होत्या. त्यावेळी शाहू महाराजांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले.
'मराठा हे कमी उंचीचे. शीख आणि पंजाबी लोकांसारखे बलंदड नाहीत. विशेष मोठा आकार हा लढण्यासाठी लाभदायक आहे.
मराठ्यांची लहान चण आहे. ते ज्या हवामानात आणि ज्या परिस्थितीत जन्मले ती परिस्थिती ते घडण्यास कारणीभूत आहे.
कठीण परिस्थितीने त्यांना काटकता आणि सहनशीलता हे गुण दिले आहेत. शाहू महाराज यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मराठ्यांचा सैन्यात जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
लढवय्या गुणामुळे एकेकाळी सारा हिंदुस्थान याच मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकून घेतला होता. आजही मराठ्यांची हिंमत व ताकद कमी झालेली नाही.' असा ठाम सल्ला त्यांनी ब्रिटिशांना दिला.