Dr. Babasaheb Ambedkar : राजेंद्र प्रसाद यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र अन् आंबेडकर संविधानसभेत परतले, काय होतं पत्रात?

Rajanand More

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास खडतर होता. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

संविधान सभा

सरकारी दस्तावेजानुसार, संविधान सभेवर सदस्यांचे निर्वाचन प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्यांद्वारे करण्यात आले. डॉ. आंबेडकर, मुंबई विधानमंडळातून निर्वाचित होऊ शकले नाहीत.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

बंगालमधून प्रवेश

बंगाल विधानमंडळातून जोगेंद्रनाथ मंडल आणि इतर अनुसूचित जातींच्या सदस्यांच्या पाठिंब्यावर त्यांनी संविधान सभेत प्रवेश मिळवला.

Dr. Babasaheb Ambedkar | एोीकोीलोसो

बंगालची फाळणी

बंगालच्या फाळणीमुळे डॉ. आंबेडकर संविधानसभेचे सदस्य राहिले नाहीत.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnma

राजेंद्र प्रसाद यांचे पत्र

संविधानसभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. जी. खेर यांना ३० जून १९४७ रोजी पत्र लिहित डॉ. आंबेडकरांची संविधानसभेवर त्वरित निवड व्हावी, असे सुचविले.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

काय होते पत्रात?

डॉ. आंबेडकरांनी विविध समित्यांवर केलेले कार्य एवढे श्रेष्ठ दर्जाचे आहे की आम्ही त्यांच्या सेवांपासून वंचित राहू इच्छित नाही. १४ जुलैपासून सुरू होणाऱ्या संविधानसभेच्या सत्रात त्यांनी उपस्थित राहावे, याविषयी मी आतूर आहे.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

पुन्हा निवड

डॉ. आंबेडकरांची १९४७ च्या जुलै महिन्यात संविधानसभेवर पुन्हा निवड झाली. त्यानंतर लगेच १५ ऑगस्ट १९४७ ला पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले.

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day

विधीमंत्री

डॉ. आंबेडकरांनी नेहरूंचे निमंत्रण स्वीकारले अन् देशाचे पहिले विधीमंत्री झाले. त्यानंतर २९ ऑगस्ट रोजी संविधानसभेत त्यांची घटना मसुदा समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती.

Dr. Babasaheb Ambedkar | Sarkarnama

NEXT : मातब्बर आमदारानेच दिले ममता बॅनर्जींना चॅलेंज; निवडणुकीच्या तोंडावर धक्का...

येथे क्लिक करा.