Pradeep Pendhare
राज्यसभेच्या 37 पैकी 26 जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित 11 जागांसाठी सोमवारी तीन राज्यांत निवडणूक प्रक्रिया झाली.
या निवडणुकीत भाजपने तब्बल नऊ जागांवर दणदणीत विजय मिळवून विरोधकांना पराभवाचा धक्का दिला.
पुरेसे संख्याबळ नसतानाही बिहारमध्ये सत्ताधारी पक्षाने दोन अतिरिक्त जागा जिंकल्याने महाआघाडीच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याची चर्चा आहे.
राज्यसभेत बहुमतासाठी 123 जागांची आवश्यकता असते.
या निकालानंतर राज्यसभेतील राजकीय गणिते बदलली असून भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 140 पेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ झाले आहे.
भारतीय जनता पक्षाकडे राज्यसभेचे सर्वाधिक 106 खासदार आहेत. त्यामुळे भाजपाने सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे.
इंडिया आघाडीकडे राज्यसभेत केवळ 79 ते 81 सदस्यांचे संख्याबळ आहे.
भाजपप्रणीत एनडीएच्या खासदारांची राज्यसभेत संख्या वाढल्याने केंद्र सरकारला आता महत्त्वाची विधेयके बहुमताने मंजूर करणं सोपे होणार