राज्यसभेचा कार्यकाळ संपतोय, 7 नेत्यांपैकी कोण परतणार?

Rajanand More

महाराष्ट्रातील 7 नेते

महाराष्ट्रातील 7 जणांचा राज्यसभेचा कार्यकाळ 2 एप्रिल 2026 रोजी संपत आहे. एकाच दिवशी हे सर्वजण निवृत्त होतील. त्यांच्यापैकी किती जण पुन्हा राज्यसभेत जाणार, याबाबत उत्सुकता आहे.

Rajya Sabha elections | Sarkarnama

शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाही कार्यकाळ संपत आहे. ते पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढण्याबाबत संभ्रम आहे.

Sharad Pawar | Sarkarnama

रामदास आठवले

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही निवृत्त होत आहेत. ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते.

Ramdas Athawale | Sarkarnama

भागवत कराड

माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही भाजपचे राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. त्यांची पुन्हा राज्यसभेत वर्णी लागण्याची शक्यता कमी आहे.

Bhagwat Karad | Sarkarnama

प्रियांका चतुर्वेदी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांची निवृत्तीही जवळ आली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यसभेत पाठविण्यात आले होते.

Priyanka Chaturvedi | Sarkarnama

रजनी पाटील

दिवंगत राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर रजनी पाटील यांची सप्टेंबर 2021 मध्ये पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड झाली होती. त्याही एप्रिलमध्ये निवृत्त होत आहेत.

Rajni Patil | Sarkarnama

फौजिया खान

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार फौजिया खान याही निवृत्त होत असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही. त्यांच्या पक्षाकडे आवश्यक संख्याबळ नाही.

Fauzia Khan | Sarkarnama

धैर्यशील पाटील

पाटील हे भाजपचे सदस्य असून त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळही मिळत नाही. ऑगस्ट 2024 मध्ये ते राज्यसभेवर गेले आहेत.

Dhairyasheel Patil | Sarkarnama

NEXT : कुक-ड्रायव्हरच्या वेतनाचा मुद्दा अन् कंगना रनौतच्या सरकारी भत्त्यांवरून वाद; किती मिळतो, कुठे होतो खर्च?

येथे क्लिक करा.