Deepak Kulkarni
रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत आहे.
महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यंदा हॅट्रिकसाठी मैदानात उतरल्या आहेत.
खडसे राजकीय फॅक्टरमुळे प्रारंभी रक्षा खडसे यांच्या उमेदवारीवार टांगती तलवार होती.
मात्र, शेवटच्या टप्प्यात खडसे यांनी दिल्लीतून फिरविलेली चक्रे आणि स्थानिक राजकारण यामुळे ही अनिश्चितता संपुष्टात आली.
भाजपच्या पहिल्याच यादीत त्यांचे नाव होते.
त्यांना प्रचारासाठी जवळपास दोन महिन्यांचा कालावधी मिळाला.
पण या निवडणुकीत महाविकास आघाडीने केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी हा अतिशय गंभीर प्रश्न प्रचारात उचलून धरला.
केळी निर्यातीत वाढ झालेली नाही. केंद्र शासनाच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची झालेली कोंडी हा अतिशय गंभीर प्रश्न महाविकास आघाडीने उपस्थित केला
रावेर आणि केळी हे एक समीकरण आहे. या समीकरणा भोवती यंदाची निवडणूक फिरत होती. दहा हजार केळी उत्पादकांना प्रलंबित प्रश्नांमुळे रक्षा खडसेंची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.