Rashmi Mane
हैदराबादच्या मृदुपाणि नंबी यांना लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती. त्यांनी त्यांचं शिक्षण बी.टेक. इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड कम्युनिकेशनमधून पूर्ण केलं.
2020 मध्ये पहिल्या प्रयत्नात त्या फक्त 1 मार्क ने प्रिलिम्स क्लिअर करू शकल्या नाहीत. हा फटका मोठा होता!
अपयशानंतर हरून न जाता त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन स्वतःला अभ्यासात झोकून दिलं. सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी त्यांनी फोन पूर्णपणे बाजूला ठेवला.
अपयशातून शिकत त्यांनी आपली चुक समजून घेतली आणि नव्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात केली.
मेहनतीचं फळ म्हणून त्यांना 2022 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात All India Rank 21 मिळवत त्यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.
मृदुपाणींना Ministry of Communications मध्ये IES ऑफिसर म्हणून नियुक्ती मिळाली.
UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या IES (Indian Engineering Services) ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यामध्ये यश मिळवण्यासाठी अतीव मेहनत घ्यावी लागते.
मृदुपाणि नंबी यांची सक्सेस स्टोरी खरचं प्रेरणादायी आहे. एका मार्काने अपयश आलं तरी हार मानू नका... पुढचा प्रयत्न तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो! ही स्टोरी हेच शिकवून जाते.