Samruddhi Mahamarg : मुंबई ते नागपूर 8 तासांत... पण 'टोल' किती रुपये लागणार?

Rashmi Mane

समृद्धी महामार्गाचे उद्घाटन

समृद्धी महामार्गाचं आज 5 जून 2025 ला उर्वरित आणि अखेरच्या 76 किमी टप्प्याचे लोकार्पण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

10 जिल्ह्यांना जोडला जाणार

यामुळे नागपूर ते मुंबई प्रवास आता अवघ्या 8 तासांत करता येणार आहे. हा महामार्ग मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, वर्धा, नागपूरसह 10 जिल्ह्यांना थेट जोडतो.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

किती टोल आकारला जातो?

सामान्य कारधारकाला आता नागपूर ते मुंबई टोलसाठी 1,445 रूपये मोजावे लागणार.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

टोल दरात वाढ

1 एप्रिल 2025 पासून नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरील टोल दरात तब्बल 19% वाढ करण्यात आली आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

टोल दर तपशीलवार

  • कार/हलकी वाहने: 2.06 रुपये प्रति किमी

  • मिनी ट्रक/बस: 3.32 रुपये प्रति किमी

  • मोठे ट्रक/बस: 6.97 रुपये प्रति किमी

  • ट्रेलर/बांधकाम वाहने: 10.93 रुपये प्रति किमी

  • मोठी वाहने (7+ एक्सेल): 13.30 रुपये प्रति किमी

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

किती अंतर?

उर्वरित आणि अखेरच्या 76 किमी टप्प्याचे लोकार्पण झाले. यामुळे आता मुंबई ते नागपूर प्रवास अवघ्या 8 तासांत गाठता येणार आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

महामार्ग बांधताना सर्व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून तो पूर्णपणे सुसज्ज आहे. सीसीटीव्ही, इमर्जन्सी कॉल बॉक्स, ट्रॅफिक मॉनिटरिंग यंत्रणा असल्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता अबाधित राहणार आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

विकासाला नवा वेग

हा महामार्ग केवळ प्रवासच नाही, तर औद्योगिक, आर्थिक आणि सामाजिक विकासालाही नवा गती देणार आहे.

Samruddhi Mahamarg | Sarkarnama

Next : शेतकऱ्याच्या लेकाची गगनभरारी ! अपयशाच्या तीन फेऱ्यांनंतर यशाचा चौकार!

येथे क्लिक करा