Ganesh Sonawane
देशातील सर्वात लांब असलेल्या समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. 701 किमीचा समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत सुरू झाला आहे.
आता मुंबई ते नागपूर हे अंतर केवळ 8 तासांत पार करणं शक्य होणार आहे. नाशिक- मुंबई प्रवास अडीच तासांत होणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी एकूण ६१ हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे.
समृद्दी महामार्गाची एकूण लांबी ७०१ किमी इतकी आहे. रुंदी १२० मीटर आहे.
समृद्दी महामार्ग हा सहा पदरी आहे.
दरम्यान तब्बल २६ टोलनाके व पाच बोगदे आहेत. अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे आहेत.
वन्यजीवांच्या मुक्त संचारासाठी एकूण १०० प्रकारच्या विशिष्ट संरचनांची उभारणी, त्यात डोंगर-दऱ्यांमधल्या ७३ व्हायाडक्टचा समावेश
देशात पहिल्यांदाच वाहनांसाठी ८ ओव्हरपास आणि ९२ अंडरपास