सरकारनामा ब्यूरो
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये सध्या एक नाव खुप चर्चेत आहे, ते म्हणजे अंजली दमानिया यांचं.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपी फरार झाल्याचा खळबळजनक दावा अंजली दमानियांनी केला असून बीड पोलिसांनी याबाबत त्यांना नोटिसही पाठवली आहे.
देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा प्रमुख सुत्रधार असल्याचा आरोप केला जात असून तो मुंडेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे दमानिया यांनी मुंडेंना टार्गेट केले आहे.
दमानिया यांच्याकडून बीडमधील अनेक व्यक्तींचे हातात बंदूक घेतल्याचे फोटो सोशल मीडियात टाकले जात आहेत. त्यांनी लोकांनाही बीडमधील गुंडगिरीची माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे.
बीडमधील गुन्हेगारीविरोधात, मुंडे जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाहीत आणि वाल्मिक कराड याला अटक होत नाही तोपर्यंत दमानियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'सत्य'शोधक आंदोलनाचा इशारा दिला आहे.
2011 मध्ये अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्या सक्रिय होत्या. त्यानंतर त्यांनी आम आदमी पक्षातही अनेक पदे भूषवली.
2012 मध्ये त्यांनी आरटीआय कायद्यानुसार कोंढाणे येथील धरण प्रकल्पातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. यामध्ये त्यांना प्रकल्पाची किंमत ₹560 दशलक्ष इतकी होती यावरून ती ₹3.28 अब्ज पर्यंत वाढल्याच आढळून होतं.
छगन भुजबळांवर डोरिन फर्नांडिस यांच घर हाडप केल्याचा आरोप होता. दमानिया यांच्यामुळे फर्नांडिस या वृद्ध महिलेला न्याय मिळाला. यावेळी त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या होत्या.
2016 मध्ये दमानिया यांनी दाऊद फोन प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्या विरोधात उपोषण करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
पोलिस दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली अन् धार्मिक कार्यात झोकून दिले! कोण होते Ex-IPS किशोर कुणाल?