Prati Sarkar : साताऱ्याचं ‘पत्री सरकार’ : स्वातंत्र्यापूर्वीच इंग्रजांना पळता भुई थोडी केली

Hrishikesh Nalagune

स्वातंत्र्याआधीच साकारलं ‘स्वराज्य’!

साताऱ्यात इंग्रजांविरोधात उभारलं होतं ‘प्रतिसरकार’

Prati Sarkar | Sarkarnama

‘चले जाव’नंतर पेटला सातारा

१९४२ मध्ये महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिल्यानंतर ब्रिटिशांविरोधातील आंदोलन तीव्र झाले. साताऱ्यात या लढ्याने वेगळेच रूप घेतले.

Prati Sarkar | Sarkarnama

नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली ‘पत्री सरकार’

क्रांतिसिंह नाना पाटील, जी. डी. बापू लाड आणि नागनाथअण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारची उभारणी झाली.

Prati Sarkar | Sarkarnama

६५० गावांत ब्रिटिश राजवट हद्दपार!

जुन्या सातारा जिल्ह्यातील जवळपास ६५० गावांमध्ये ब्रिटिश प्रशासनाला आव्हान देत प्रतिसरकारने स्वतःचा कारभार सुरू केला. कुंडल हे त्याचे प्रमुख केंद्र बनले.

Prati Sarkar | Sarkarnama

फक्त स्वातंत्र्यलढा नाही, समाजसुधारणाही!

सावकारीला विरोध, जमिनीचे फेरवाटप, शिक्षणाचा प्रसार, अस्पृश्यता निवारण आणि हुंडाबंदी अशा अनेक सामाजिक-आर्थिक सुधारणा प्रतिसरकारने राबवल्या.

Prati Sarkar | Sarkarnama

‘तुफान सेना’ होती प्रतिसरकारची ताकद

कुंडलमध्ये तरुणांना लष्करी कवायती आणि शस्त्रप्रशिक्षण दिले जात होते. या भूमिगत सेनेने ब्रिटिश यंत्रणेला मोठा धक्का दिला.

Prati Sarkar | Sarkarnama

रेल्वे-टपाल व्यवस्था केली ठप्प

तुफान सेनेने सरकारी तिजोरीवर कारवाया केल्या, रेल्वे मार्ग रोखले आणि टपाल सेवा विस्कळीत करून ब्रिटिश प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे केले.

Prati Sarkar | Sarkarnama

३३ महिने भूमिगत लढा!

ब्रिटिशांनी नेत्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम उघडली. मात्र स्थानिक जनतेचा पाठिंबा आणि डोंगर-दऱ्यांचा आधार घेत क्रांतिकारकांनी दीर्घकाळ कारभार सुरू ठेवला.

Prati Sarkar | Sarkarnama

ऑक्टोबर १९४६ पर्यंत सुरू राहिले प्रतिसरकार

जुलै १९४३ मध्ये अधिकृतपणे सुरू झालेले हे प्रतिसरकार सुमारे ३३ महिने टिकले. ब्रिटिश राजवटीला थेट आव्हान देणाऱ्या या प्रयोगाने स्वराज्याची झलक दाखवली.

Prati Sarkar | Sarkarnama

स्वातंत्र्याआधीच सातारकरांनी जगलं स्वराज्य!

‘पत्री सरकार’चा लढा हा केवळ ब्रिटिशांविरोधातील संघर्ष नव्हता; तो सामाजिक न्याय, लोकशाही आणि स्वाभिमानासाठीचा ऐतिहासिक प्रयोग होता.

Prati Sarkar | Sarkarnama
Narendra Modi | sarkarnama
विकसित भारतासाठी PM मोदींनी सांगितली 'सप्तधारा'