सरकारनामा ब्युरो
राजर्षी शाहू महाराज यांनी हयातभर रयतेची काळजी वाहिली. बहुजनांविषयी प्रचंड तळमळ आणि आस्था असणारा हा राजा होता.
शिक्षण, आरोग्य, शेती, सिंचन, उद्योग या क्षेत्रांना बळ मिळेल, अशी धोरणे राबवली. अनेक सामाजिक सुधारणांचा पाया घातला.
महिलांचे शिक्षण, बहुजनांसाठी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनाच आरक्षणाचे जनक म्हटले जाते.
राजर्षी शाहू महाराजांच्या प्रजाहितदक्ष धोरणांचा, सामाजिक सुधारणांचा आजही जगभर अभ्यास केला जातो.
म्हणूनच शाहू महाराजांना राजांमधील ऋषी म्हणजेच राजर्षी अशी पदवी देऊन गौरविण्यात आले.
आधुनिक इतिहासात आणि समाजात या गौरवाला पात्र ठरणारे व्यक्तिमत्त्व म्हणून फक्त शाहू महाराजांचाच विचार केला गेला.
1919 साली अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय समाजाकडून कानपूरच्या परिषदेत शाहू महाराजांना 'राजर्षी' पदवी बहाल करण्यात आली.
यापूर्वी 'राजर्षी' ही पदवी सीतामाईचे पिता राजा जनक यांना दिली गेली आहे
जो राजा राजगादीकडे केवळ कर्तव्य भावनेने पाहतो, तिथले उपभोग घेताना त्यांचा मनातून त्याने त्याग केलेला असतो, असा ऋषीसमान राजा म्हणजे 'राजर्षी' होय.