Akshay Sabale
अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या आणखी जवळ जातील, तर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.
पुढील दोन वर्षात विविध प्रादेशिक पक्ष काँग्रेसबरोबर अधिक समन्वयाने काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन काँग्रेसमध्ये विलीन होतील.
मला काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारकिदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरूंची विचारसरणी मानणारे आहोत.
प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या प्रक्रियेबाबत मी आत्ताच बोलू शकणार नाही. सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काहीही बोलणार नाही.
वैचारिकदृष्ट्या आमचा पक्ष काँग्रेसच्या जवळचा आहे. पण, आमच्या पक्षाबाबत कोणतंही पाऊल उचलताना किंवा रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीनं निर्णय घेतला जाईल.
पंतप्रधान मोदी यांच्याशी जुळवून घेणं किंवा त्यांचे विचार पचनी पडणं आमच्यासाठी अवघड आहे.
राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या फुटीवर शरद पवार म्हणाले, ज्यांनी मोदी यांना साथ दिली आहे, त्यांना जनता पसंत करत नाही.
उद्धव ठाकरे हे देखील एकत्र काम करण्याच्या प्रस्तावाबाबत सकारात्मक आहेत. समविचारी पक्षांसोबत काम करण्यासाठी ते तयार आहेत.
मी गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरेंच्या विचाराची पद्धत अनुभवली आहे, ते आमच्यासारखेच आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले.