Rashmi Mane
25 वर्षांनंतर ‘तुलसी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांचा पहिला लुकही व्हायरल झाला आहे.
2024 मध्ये अमेठीमध्ये पराभव झाला त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. म्हणून त्यांनी अभिनयाकडे मोर्चा वळवला का असा सवालही विचारला जातोय?
‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेनंतर 2014 मध्ये स्मृती इराणीने राहुल गांधीविरुद्ध निवडणूक लढवली, त्यानंतर 2019 मध्येही निवडणूक जिंकली. पण 2024 मध्ये काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांकडून पराभव झाला.
स्मृती इराणी म्हणते, 2014 मध्येच शोच्या रिबूटचा विचार सुरू होता. मात्र मंत्रीपदामुळे ती शक्य नव्हतं. आता वेळ मिळाल्याने ही भूमिका पुन्हा साकारते आहे.
‘सास भी कभी बहू थी’ हा शोने प्रत्येक घरात स्थान मिळवलं. तुलसी-मिहीरची जोडी फेमस झाली.
टीव्हीवरील ‘तुलसी’ भूमिका लोकांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे हा कमबॅक पब्लिक इमेज मजबूत करण्याची रणनीतीही असू शकते.
'तुलसी परत आली!', 'आमचं बालपण परत आलं!' — अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
मालिकेचा पहिला लूक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओमुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.