Chetan Zadpe
2004 मध्ये यूपीए सरकारची सत्ता आली. यामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी देशाचे दुसऱ्या महिला पंतप्रधान होतील, अशी चर्चा होत होती.
भाजपसह अनेक पक्षांनी सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदाला विरोध दर्शवला होता.
सोनिया गांधी यांचं मूळ विदेशी असल्यामुळे भाजपसहित अनेक पक्ष आणि संघटनांनी विरोध दर्शवला होता.
2004 च्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर यूपीएची सत्ता आली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या चेहरा पुढे करून निवडणुका लढवल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे देशाचे लक्ष लागले होते.
अशा स्थितीत काँग्रेसच्या पक्षांतर्गत नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्ष समर्थकांची सोनिया गांधींवर पंतप्रधानपद स्वीकारावे, यासाठी मोठा दबाव होता.
पक्षात या मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चेनंतर मनमोहनसिंग यांचे नाव पुढे करून सोनियांनी स्वत:ला पक्षाध्यक्षपदाच्या भूमिकेत ठेवले.
सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे विदेशी वंशाचा मुद्द्याला असलेला भाजपचा विरोधही थंड पडला.
18 मे 2004 रोजी मनमोहनसिंग यांना सोबत घेऊन सोनिया गांधी तत्कालीन राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुवब्दीन अब्दुल कलाम यांच्याकडे पोहोचले अन् सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.