Jagdish Patil
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर प्रवाशांनी महाकुंभला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
स्वतंत्रा सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी या दोन्ही गाड्यांची हजारो प्रवासी वाट पाहत होते.
गाडी येताच प्रवाशांनी लगेच आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी14 आणि 16 प्लॅटफॉर्मवर अचानक चेंगराचेंगरी झाली.
मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि 10 महिलांसह 18 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत.
तर 400 जागांसाठी रेल्वेने दर तासाला 1500 जनरल तिकटांची विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
चेंगराचेंगरी झाली तेव्हा अनेक प्रवाशांचा श्वास गुदमरला होता. यावेळी लहान मुलांसह स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
जीव वाचवण्यासाठी लोक दिसेल त्या मार्गाने बाहेर जाण्याचा प्रयत्न करत होते, धडपडत होते.