सरकारनामा ब्यूरो
भारतात एकूण 28 राज्य आहेत. या प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी संस्कृती, भाषा, आणि जीवनशैली आहे.
28 राज्यापैकी उत्तर प्रदेशातील लोकसंख्या ही इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे.
जवाहरलाल नेहरु पासून ते नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नेत्यांनी यूपीमधून निवडणूक लढवत आहे.
यूपीमध्ये लोकसभेच्या सर्वांधिक जागा असल्यामुळे या राज्यातील कोणत्याही पक्षाचा विजय हा राष्ट्रीय पातळीवरील गेमचेंजर मानला जातो.
1947 मध्ये भारताला स्वांतत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उत्तर प्रदेशातील फुलपूर, अलाहाबाद येथून निवडणूक लढवली होती.
इंदिरा गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबरेली या शहरातून, राजीव गांधींनी अमेठी येथून, आणि अटलबिहारी वाजपेयी यांनी लखनऊ येथून निवडणूक लढवली होती.
वी.पी सिंह यांनी फतेहपूर येथून तर भारताचे आठवे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी 'बलिया' या जिल्ह्यातून निवडणूक लढवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा 2024 ची लोकसभा निवडणूक वाराणसी मतदारसंघातून लढवली आणि जिंकलीही.