Deepak Kulkarni
केंद्र सरकारसह राज्य सरकारकडूनही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू असतात. आता राज्य सरकारनं इलेक्ट्रिक वाहनांंच्या प्रसारासाठी मोठा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना शेतीतील विविध कामांसाठी ट्रॅक्टरची आवश्यकता भासत असते. पण आर्थिक परिस्थितीमुळे काहीजणांना ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य होत नाही.
महायुती सरकारनं आता शेतकऱ्यांच्या खर्च वाचवण्यासाठी आणि उत्पन्नवाढीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पण आता जर शेतकऱ्यांनी जर ट्रॅक्टरची खरेदी केला तर त्यांना सरकार आर्थिक मदत करणार आहे.
राज्य सरकारनं आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टरवर अनुदान देण्याचा निर्णय मोठा घेतला आहे.
हे अनुदान तब्बल दीड लाख रुपये असणार आहे.
दिवसेंदिवस वाढत असलेल्या इंधनाच्या किमतींमुळे शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. हा निर्णय निश्चितच दिलासा देणारा आहे.
इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या विक्री वाढण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून बळीराजाला ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी व्याजमुक्त कर्जही उपलब्ध करुन दिले जाणार आहे.