सरकारनामा ब्यूरो
2016 बॅचच्या IAS गंधर्व राठोर यांनी कोणतेही कोचिंग न घेता यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत अनेकांना प्रेरणा देत आहेत.
राजस्थानच्या जयपूर येथे शालेय शिक्षण पूर्ण करताच नवी दिल्लीच्या श्रीराम काॅलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
शिक्षणानंतर लगेच त्यांनी यूपीएससीच्या तयारीला सुरुवात केली आणि फक्त त्यावरच लक्ष केंद्रित केले.
पहिल्या प्रयत्नात 2 ते 3 गुणांनी त्यांना अपयश आले. मात्र, धीर न सोडता त्यांनी पुन्हा तयारी केली अन् परीक्षेला बसल्या.
अथक प्रयत्नांनी दुसऱ्या प्रयत्नात 93 व्या रँकसह त्यांनी परीक्षेत यश मिळवत त्या IAS अधिकारी झाल्या.
दोन्ही वेळा त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता केवळ स्वत:च्या तयारीच्या जोरावर ही परीक्षा उत्तीर्ण केली.
अभ्यास करताना मित्रपरिवार, यशस्वी लोक तसेच तज्ज्ञांचे व्यवस्थित मार्गदर्शन घेतले. ज्यामुळे त्यांना ही परीक्षा पास होणे शक्य झाले.
कशाप्रकारे हे यश मिळवले तसेच अभ्यासाची रणनीती यांसारख्या अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी सराव करणे हा मंत्र त्या नेहमीच सांगत असतात.
R