सरकारनामा ब्यूरो
पंजाबमधील गुरुदासपूर येथील रियार यांचा शैक्षणिक प्रवास आव्हानांनी भरलेला होता.
सहावीत असताना नापास झाल्यामुळे त्यांची प्रगती खुंटली असल्याने सुरुवातीपासूनच त्यांना शैक्षणिक संघर्ष होता.
कुटुंबाची आणि शिक्षकांची निराशा वाढण्याची भीती न बाळगता त्यांनी तिचे शक्तीमध्ये रूपांतर केेले, यश मिळवले.
कमी गुणांचा सामना करत त्यांनी गुरुदासपूर आणि डलहौसी येथे 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
हार न मानता रात्रंदिवस अभ्यास केला, अमृतसरच्या गुरुनानक देव विद्यापीठातून त्यांनी सामाजिक शास्त्राची पदवी मिळवली.
मुंबईतील प्रतिष्ठित टाटा इन्स्टिट्यूटमधून पदव्युत्तर पदवी मिळवली तसेच सुवर्णपदकही त्यांनी प्राप्त केले.
शिक्षण पूर्ण करताच त्यांनी स्वयंसेवी संस्थांसोबत काम केले, ज्यामुळे त्यांना UPSC परीक्षा देण्याची इच्छा निर्माण झाली.
देशभरात दुसरे स्थान मिळवून यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात उल्लेखनीय यश मिळवून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले.