Pradeep Pendhare
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, यावरून राज्याच्या राजकारण ढवळून निघालं आहे.
अजित पवार यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावरून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.
वडील दत्तात्रय तटकरे हे काँग्रेसचे नेते आणि सरपंच, जिल्हा परिषद सदस्य होते. त्यामुळे त्यांना घरातूनच राजकीय वारसा लाभला. वडिलांच्या निधनानंतर वसंतदादांनी सुनील तटकरे यांना राजकीय बळ दिलं.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुनील तटकरे यांची 1984 मध्ये राजकारणात एन्ट्री झाली. वसंतदादानी 1985 मध्ये विधानसभेचे तिकीट दिले, पण ते पराभूत झाले. पुढे 1995 मध्ये ते आमदार झाले.
शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी सुनील तटकरे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
सुनील तटकरे हे शरद पवार आणि अजित पवार यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक, अशी ओळख आहे.
सुनील तटकरे यांचे राज्यातील राजकीय वजन 1999 नंतर वाढले आहे. पक्षफुटीनंतरही त्यांचे स्थान अबाधित राहिले.
2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादीत फूट पडली अन् सुनील तटकरे यांनी, अजित पवार यांचं नेतृत्व स्वीकारलं. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली.
अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता.
मित्रपक्ष भाजपमधील नेते अमित शहा यांच्याबरोबर दिल्लीत वजन वाढवल्याची चर्चा आहे.