Rajanand More
राज्यसभेतील खासदार स्वाती मालीवाल यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देत नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत आपच्या इतर सहा खासदारांनीही हातात कमळ घेतले आहे.
आपकडून मालीवाल यांच्यासह सातही खासदारांवर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला आहे. मालीवाल या दिल्लीतून निवडून गेल्या आहेत.
मालीवाल यांनी मंगळवारी (ता. २८) आपच्या नेत्यांना पहिल्यांदाच प्रत्युत्तर दिले. अरविंद केजरीवार यांच्या घरात PA कडून मारहाण झाली. त्यानंतर आपलीच बदनामी करण्यात आल्याचे मालीवाल म्हणाल्या.
राज्यसभेत ९५ टक्के उपस्थिती असून पक्षाने आपल्याला बोलण्याची संधी दिली नाही, अशी नाराजीही मालीवाल यांनी व्यक्त केली आहे.
महिलेला मारहाण करणारे, तिला सन्मान न देणारे, पंजाबचा विश्वासघात करणारे, भ्रष्टाचाराचे दुकान उघडून बसलेले आणि आंदोलनाचा आत्मा विकणारे खरे गद्दार असल्याची मालीवाल यांची टीका.
मालीवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आतापर्यंत घेतलेल्या निर्णयांचा पाढा वाचत त्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
मालीवाल यांनी भाजप नेतृत्वाचे आभार मानताना आपण मेहनत, प्रामाणिकपणा आणि पूर्ण निष्ठेने देशाची सेवा करू, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
माझ्या आयुष्यातील पहिल्या चॅप्टरचा हा शेवट होता. दुसऱ्या चॅप्टरमध्ये तुम्ही मला अधिक मेहनत आणि हिंमतीने देशासाठी काम करताना पाहाल, असे मालीवाल यांनी म्हटले आहे.