Roshan More
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेतील नियमांत राज्य शासनाकडून महत्त्वाचा बदल.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केले नवे शुद्धीपत्रक.
भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शाळा संस्थांना आता २ ऐवजी ३ महिन्यांचा वेळ मिळणार.
अर्ज पडताळणी, मुलाखती, अध्यापन कौशल्य चाचणी व प्रशासकीय मान्यतेतील विलंब विचारात घेऊन निर्णय.
प्रशासकीय व टपाल प्रक्रियेतील विलंबा मुळे येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी १ महिन्याची मुदतवाढ.
खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व अध्यापक विद्यालयांसाठी नियम लागू.
६ फेब्रुवारी २०२२ च्या मूळ शासन निर्णयातील उर्वरित सर्व अटी व तरतुदी कायम राहतील.
भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन सुधारण्यास मदत होणार.