Pradeep Pendhare
24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या प्रतीवर पहिली स्वाक्षरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली.
हस्तलिखित खराब होऊ नये यासाठी 1980च्या दशकात भारत सरकारने प्रयत्न सुरू केले.
हस्तलिखित संविधान सुमारे 221 पानांचे असून ते 13 किलो वजनांचे आहे.
या संविधानाच्या बांधणीत मोरोक्को लेदर आणि सोनेरी वर्ख वापरलेला आहे.
संविधानाच्या हस्तलिखित तीन प्रती असून, जतनाची जबाबदारी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेकडे देण्यात आली आहे.
देशाचा अमूल्य वारसा जपण्यासाठी राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळेने अमेरिकेतली गेट्टी काॅन्झर्वेशन इन्स्टिट्यूटची मदत घेतली.
हस्तलिखित संविधानाच्या जतनासाठी 20 डिग्री तापमान राखणाऱ्या, 30 टक्के आर्द्रता असलेल्या दोन काचेच्या पेट्या तयार केल्या.
या पेट्यांमध्ये हस्तलिखित प्रती सुरक्षित असून, जुन्या संसदेच्या इमारतीतमध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत.