Rashmi Mane
1753 : मराठा सैन्यातील पहिल्या महिला सेनापती उमाबाई दाभाडे यांचे निधन.
1890 : श्रेष्ठ समाजसुधारक, विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत महात्मा जोतिराव गोविंदराव फुले यांचे निधन. स्त्री हक्क, स्त्रीदास्य विमोचन, स्त्रियांचे समान हक्क या सर्व विचारांना महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली व स्त्री जीवनात शिक्षणाची नवी पहाट उजाडली.
1964 : नासाचे मरिनर - ४ या अंतराळयानाची मंगळ मोहिमेसाठी झेप
1967 : मुळशी सत्याग्रहाचे नेते, थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती पांडुरंग महादेव बापट यांचे निधन. त्यांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध मुळशीचे बंड करून स्वातंत्र्यलढ्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले. महायोगी अरविंदांचा "लाईफ डिव्हाईन' या ग्रंथाचा त्यांनी अनुवाद केला व "दिव्य जीवन' हा अप्रतिम अनुवाद ग्रंथ सिद्ध झाला.
2000 : महाराष्ट्र राज्यात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या वाहनांमधून मंजूर क्षमतेच्या दीडपटीपेक्षा जास्त विद्यार्थी नेऊ नयेत, असा उच्च न्यायालयाचा आदेश.
2004 : रशियाच्या तांत्रिक सहकार्यातून ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) तयार करण्यात आलेली संपूर्ण स्वदेशी बनावटीची बहुउपयोगी "सुखोई-30' लढाऊ विमाने देशाला अर्पण. आवाजापेक्षाही अधिक गतीने उडणाऱ्या 26 टन वजनाच्या व सर्व प्रकारच्या आण्विक व पारंपरिक क्षेपणास्त्रांसह अचूक बॉंबफेकीची क्षमता असलेले हे विमान आहे.
2008 - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठीच्या एनएसजीच्या कारवाईत मेजर संदीप उन्नीकृष्णन शहीद