Roshan More
1959 - मुसलमानी काळापासून ब्रिटिश अमदानीपर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास लिहिणारे रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांचे निधन.
1975 - मुंबईच्या जसलोक रूग्णालयातील कॅन्सर चिकित्सा विभागाचे तत्कालिन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
1993 - आधुनिक भारतीय उद्योगाचे शिल्पकार आणि भारतीय नागरी विमान वाहतुकीचे जनक भारतरत्न जे.आर.डी.टाटा यांचे निधन. त्यांचे नाव जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. "भारतरत्न' हा सर्वोच्च बहुमान मिळालेले ते पहिले उद्योगपती. त्यांना अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले.
1996 - नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांना त्यांच्या मायभूमी अल्बानियाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार (गोल्डन ऑनर) जाहीर.
1999 - पुण्याच्या गजबजलेल्या अप्पा बळवंत चौकाच्या रूंदीकरणाला महापालिकेकडून सुरूवात
2000 - दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष डॉ.नेल्सन मंडेला व बांगलादेशाच्या ग्रामीण बँकेस गांधी शांतता पुरस्कार जाहीर.
2003 - स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या दोन राष्ट्रपुरुषांच्या तैलचित्रांचे अनावरण उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांच्या हस्ते महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात झाले.