Sachin Waghmare
प्रत्येक कुटुंबातील ७० वर्षे पूर्ण झालेल्या लोकांच्या आरोग्याची जबाबदारी मोदींची राहील. त्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार केंद्र सरकार करेल.
वर्धा, सेवाग्राम, हिंगणघाट या भागात चांगली रेल्वेसेवा सेवा झाली आहे. वर्धा-यवतमाळ-वाशीम या भागात रेल्वेचे जाळे विनले जात आहे, या भागाचा विकास होत आहे.
अमरावतीमध्ये टेक्सटाईल्स पार्कदेखील बनवले जात आहे. त्यामुळे विदर्भाचा आता चांगला विकास होत आहे.
हायवे- एक्स्प्रेस वे हा विदर्भातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी समृद्धी ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या आणि गोर गरिबांच्या विकासाची विरोधी भूमिका ही नेहमीच काँग्रेसची राहिलेली आहे.
'बारशाला गेला आणि बाराव्याला आला', अशीच भूमिका काँग्रेसची असून विदर्भाला काँग्रेसच्या धोरणाचे मोठे धोके सहन करावे लागले आहेत.
पुढील पाच वर्षांत महिला बचत गटांतील महिलांना वेगवेगळ्या क्षेत्रात नेणार. तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविणार
गँरंटी देण्यासाठी मोठी हिम्मत लागते. संकल्प लागतो. रोड मॅप लागतो. गॅरंटी ही तीन अक्षरांचा खेळ नाही. सतत त्यासाठी काम करणे हे गरजेचे असते.
राज्यात सत्ताधारी असलेले एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांचे सरकार विदर्भाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.