Jagdish Patil
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला.
त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा जाणून घेऊया.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार. शिक्षण आणि आरोग्यासाठीचा TCS 5% वरून 2% पर्यंत कमी केला जाणार.
अपघाती विम्यावर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स आकारला जाणार नाही.
मुंबई-पुणे आणि पुणे-हैदराबाद नवे रेल्वे कॉरिडॉर निर्माण केले जाणार. तसंत 20 नवे जलमार्ग बनवण्याची घोषणा.
देशात 3 नवीन आयुष आयुर्वैदीक कॉलेज उभारणार. भारताला मेडिकल टुरीझम केंद्र बनवणार.
मुलींच्या उच्चशिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारली जाणार.
सेमीकंडक्टर क्षेत्रासाठी 40 हजार तर बायोफार्मासाठी 10 हजार कोटींची तरतूद.
देशातील 5 विद्यापीठ टाउनशिपचा विकास, यामध्ये शिक्षण, संशोधन, क्रीडा आणि स्टार्टअप्ससाठी एकच सुविधा उपलब्ध करणार.
परदेश प्रवासावर आकारला जाणारा कर कमी करण्यात आला आहे.
महात्मा गांधी ग्रामस्वराज योजना राबवत एक जिल्हा एक उत्पादन आणि ग्रामीण भागातील तरुणांना ट्रेनिंग आणि उद्योग दिले जातील.