UPSC क्रॅक करूनही IAS अधिकारी ट्रेनिंगमध्ये फेल; आता नोकरी राहणार की जाणार? काय सांगतो नियम?

Rashmi Mane

UPSC पास म्हणजे

UPSC सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी गोष्ट असली तरी त्यानंतरचा प्रवास तितकाच आव्हानात्मक असतो. निवड झालेल्या उमेदवारांना मसुरी येथील LBSNAA अकादमीत कठोर प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.

UPSC Sanjay Dahria | Sarkarnama

प्रशिक्षणादरम्यान अनेक जण नापास

या प्रशिक्षणातील परीक्षा आणि मूल्यांकन यशस्वीपणे पार केल्यानंतरच अधिकारी पूर्णपणे सेवेत रुजू होतात.

लाखो उमेदवार, पण IAS मोजकेच

दरवर्षी सुमारे 5 ते 6 लाख उमेदवार UPSC परीक्षा देतात. मात्र त्यापैकी केवळ 182 ते 184 जणांची IAS साठी निवड होते. निवडीनंतर दोन वर्षांचे अनिवार्य प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते.

UPSC Exam | Sarkarnama

कोणत्या परीक्षांमध्ये येते अडचण?

प्रोबेशनर्सना मिळालेल्या राज्याच्या स्थानिक भाषेची परीक्षा अनेकांसाठी कठीण ठरते. वेगळ्या राज्याचा कॅडर मिळाल्यास त्या भाषेचे ज्ञान मिळवणे आणि परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठे आव्हान बनते.

UPSC EXAM | Sarkarnama

री-एग्झामची मिळते संधी

प्रशिक्षणादरम्यान एखाद्या विषयात अपयश आले तरी लगेच नोकरी धोक्यात येत नाही. अधिकाऱ्यांना पुनर्परीक्षेची संधी दिली जाते. बहुतेक उमेदवार री-एग्झाममध्ये यश मिळवून पुढील टप्प्यात प्रवेश करतात.

UPSC EXAM | Sarkarnama

कोणत्या विषयांची होते परीक्षा?

LBSNAA मध्ये कायदा, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, लोकप्रशासन, व्यवस्थापन आणि वर्तनशास्त्र यांसारख्या विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण मिळवणे आवश्यक असते.

UPSC exam | Sarkarnama

नोकरी जाते का?

प्रशिक्षणातील परीक्षा पास करण्यासाठी प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही. मात्र सेवेत रुजू झाल्यानंतर चार वर्षांच्या आत सर्व आवश्यक परीक्षा उत्तीर्ण करणे अपेक्षित असते. केवळ परीक्षेत नापास झाल्यामुळे कोणालाही सेवेतून काढण्यात आलेले नाही.

UPSC exam | Sarkarnama

शिस्तभंगावर मात्र कारवाई

प्रोबेशनर्सवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते. कमी उपस्थिती, PT सत्रांना गैरहजेरी, वर्गात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर आणि इतर नियमभंग यामुळे ही कारवाई होते. भावी अधिकाऱ्यांमध्ये शिस्त आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी हे नियम कठोरपणे लागू केले जातात.

UPSC Exam | Sarkarnama

Next : जुनी पेन्शन योजना लागू होणार? सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय; नक्की कोणाला मिळणार फायदा?

येथे क्लिक करा