Ganesh Sonawane
UPSC च्या परीक्षेदरम्यान नाशिकमधील एका परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थी उशीरा पोहचल्याने त्यांना नियमानुसार प्रवेश नाकारण्यात आला.
अवघ्या दोन ते तीन मिनिटांच्या उशिरामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याने संतप्त विद्यार्थी आणि पालकांनी केंद्राबाहेर तीव्र निदर्शने केली.
परीक्षेसाठी सकाळी ९:३० वाजताची रिपोर्टिंग वेळ निश्चित होती. शहरातील खड्डे व वाहतुकीमुळे पोहोचायला विलंब झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
त्यावर नाशिक जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढत विद्यार्थ्यांचा दावा फेटाळून लावला व UPSC चा नियम सांगितला.
संघ लोकसेवा आयोग (UPSC)परीक्षा नियमावलीमधील मुद्दा क्रमांक 6.4 अन्वये, असलेला नियम प्रशासनाने सांगितला.
त्यानुसार, परीक्षा सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी किमान 30 मिनिटे प्रवेशद्वार बंद करण्यात येते व त्यानंतर प्रवेश देण्याचे अधिकार कोणत्याही अधिकारी अथवा कर्मचारी यांना नाहीत.
ही कालमर्यादा देशभरातील सर्व परीक्षा केंद्रांसाठी एकसमान व प्रमाणित असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाने दिली.
तथापि विहित वेळेत केंद्रावर उपस्थित राहणे ही सर्वस्वी परीक्षार्थीची जबाबदारी असते. असे नाशिक जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केलं.