UPSC परीक्षेत आता AI वापर ; ट्रायल यशस्वी, हेराफेरी थांबणार?

Rashmi Mane

नवीन तंत्रज्ञान

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आता आपल्या परीक्षांमध्ये हेराफेरी आणि बनावट उमेदवार ओळखण्यासाठी ‘एआय’वर आधारित चेहरा पडताळणी तंत्रज्ञान वापरण्याची योजना सुरू केली आहे.

UPSC | Sarkarnama

यशस्वी चाचणी

यासाठीच्या पायलट प्रोग्रामची यशस्वी चाचणी नुकतीच घेतली गेली असून भविष्यात या प्रणालीचा परीक्षांमध्ये वापर सुरू होणार आहे, असे यूपीएससी अध्यक्ष अजयकुमार यांनी सांगितले.

UPSC | Sarkarnama

केंद्रीय लोकसेवा आयोग

उच्च प्रशासनिक सेवा, परराष्ट्र सेवा, पोलिस सेवा आणि इतर नागरी सेवा भरतीसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे दरवर्षी परीक्षा घेतल्या जातात.

UPSC | Sarkarnama

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

या परीक्षांमध्ये उमेदवारांच्या ओळखीची खात्री करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल.

UPSC | Sarkarnama

पारदर्शकता

नॅशनल ई-गव्हर्नन्सशी भागीदारी करून चेहरा पडताळणीसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले गेले आहे. ही प्रणाली फक्त परीक्षेच्या दिवशी उमेदवारांच्या फोटोची पडताळणी करणार नाही, तर भविष्यात परीक्षेतील हेराफेरी टाळण्यासाठीही महत्त्वाची ठरणार आहे.

UPSC | Sarkarnama

परीक्षा प्रक्रियेत सुरक्षितता

यूपिएससीच्या या नवीन प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा प्रक्रियेत सुरक्षितता वाढेल आणि बनावट उमेदवार परीक्षेत प्रवेश करू शकणार नाहीत, असा विश्वास आहे.

UPSC | Sarkarnama

कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

तसेच, या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू करण्यात आले आहे.

UPSC | Sarkarnama

Next : लाडकी बहिणींनो! e-KYC अनिवार्य; कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया 

येथे क्लिक करा