Jagdish Patil
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध चांगलंच भडकलं आहे.
मात्र, या दोन्ही देशातील व्यापारी युद्धाचा फायदा भारताला मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे.
व्यापार युद्धामुळे अमेरिका आणि चीनमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे चीन भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे.
कारण चीनच्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी भारतीय कंपन्यांना 5 टक्क्यांपर्यंत सवलतीच्या दरात माल पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
चीनच्या या निर्णयामुळे भारतात टीव्ही, फ्रिज, स्मार्टफोन यासारख्या अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होऊ शकतात.
अमेरिकेने 125 टक्के टॅरिफ लादल्यामुळे चीनी वस्तू महाग होतील. त्यामुळे चीनच्या अमेरिकेतील 100 डॉलरच्या वस्तूंची किंमत 225 डॉलर होईल आणि चीनी वस्तूंची मागणी घटेल.
त्यामुळे आपल्या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी चिनी कंपन्यांनी भारताला 5 टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे.
चीनमधून भारतात इलेक्ट्रॉनिक उपकरणं मोठ्या प्रमाणात आयात केली जातात. यामध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही अशा उपकरणांचा समावेश आहे.
दरम्यान, अमेरिका-चीनमधील व्यापार युद्धाचा संपूर्ण जगाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेने दिला आहे.