Roshan More
केंद्र सरकारच्या गृहविभागाने पूर्ण सहा कडव्यांचे वंदे मातरम् गायन अनिवार्य केले आहे.
जन गण मन हे राष्ट्रगीत आहे. त्या च्या आधी वंदे मातरम् संपूर्ण म्हणणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वंदे मातरममधील पहिली दोन कडवीच गायली जात होती. आता संपूर्ण सहाही कडव्यांचे गायन अनिवार्य आहे.
बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ कादंबरीमध्ये वंदे मातरम हे समाविष्ट होते.
1896 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ ठाकरे यांनी हे गीत गायले.
1905 साली बंगालीच फाळणी करण्यात आली होती. तेव्हा हे गीत क्रांतीचे प्रतीक बनले होते.
1937 मध्ये राष्ट्रीय काँग्रेसने या गीताची पहिली दोन कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता दिली.
वंदे मातरम या गीतामध्ये पहिल्या दोन कडव्यात मातृभूमीला वंदन आहे. तर, उर्वरीत कडव्यांमध्ये देवीचे वर्णन आणि त्यांना नमन आहे. त्यामुळे या गीताला विशिष्ट समुदायातील नेत्यांकडून विरोध करण्यात आला होता.