Pradeep Pendhare
भाजप एनडीएचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांच्या राजीनाम्यानंतर, उपराष्ट्रपतीपदाचा इतिहास चर्चेत आला आहे.
भारताचे उपराष्ट्रपती जे नंतर राष्ट्रपती झाले, भारताचे पहिले उपराष्ट्रपती एस. राधाकृष्णन होते. त्यांनी 1952 ते 1962 काळात उपराष्ट्रपती होते. यानंतर 1962 मध्ये त्यांची राष्ट्रपतीपदी निवड झाली. ते भारताचे दुसरे राष्ट्रपतीपदी होते.
झाकीर हुसेन यांनी 1962 ते 1967 या काळात उपराष्ट्रपतीपद संभाळले. यानंतर 1967-69 या काळात राष्ट्रपती झाले. पुढं त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवलं आहे.
वराहगिरी वेंकट गिरी हे भारताचे 1967 ते 1969 पर्यंत उपराष्ट्रपती होते. त्यानंतर, ते भारताचे कार्यवाहक राष्ट्रपती आणि नंतर राष्ट्रपती झाले. त्यांनी स्वतःच स्वतःचा राजीनामा मंजूर केला.
आर वेंकटरामन यांनी इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक 1984 मध्ये जिंकली. यानंतर पुढं 1987-1992 पर्यंत राष्ट्रपती म्हणून काम केले. त्यांनी चार पंतप्रधानांसोबत काम केले.
शंकर दयाळ शर्मा 1987 ते 88 उपराष्ट्रपती होते. पुढे काँग्रेसकडून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत जिंकले. 1992-1997 या काळात ते राष्ट्रपती होते.
केआर नारायण हे 1992 ते 1997 पर्यंत उपराष्ट्रपती आणि पुढे 1997 ते 2002चा राष्ट्रपती झाले. नारायणन हे एक स्वतंत्र आणि खंबीर राष्ट्रपती म्हणून ओळखले जातात.
हमीद अन्सारी यांनी 2007 ते 2017 या काळात उपराष्ट्रपतीपद पद भूषवले. एस राधाकृष्णन यांच्यानंतर निवडणुकीतून दुसऱ्यांदा पद मिळवणारे ते एकमेव उपराष्ट्रपती आहेत. भारताचे सर्वात जास्त काळ उपराष्ट्रपती राहिले.