सरकारनामा ब्यूरो
मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातून सुरभी गौतम येतात.
शालेय जीवनापासूनच अभ्यासात त्या सातत अव्वल स्थान मिळवत आल्या आहेत.
प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही साधन-सुविधा नसताना 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले होते.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणाऱ्या त्यांच्या गावातील त्या पहिली मुलगी ठरल्या आहेत.
भोपाळ विद्यापीठात त्यांनी अव्वल स्थान मिळवत इलेक्ट्रॉनिक्स आणि संज्ञापनशास्त्रामध्ये पदवी प्राप्त केली.
UPSC परीक्षेला बसण्यापूर्वी सुरभी गौतम यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण केल्या होेत्या.
तसेच Bhabha Atomic Research Centre (BARC) मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नोकरी केली.
दिल्ली पोलिस आणि फूड काॅर्पोरेशन ऑफ इंडियासारख्या परीक्षा पास केल्या तसेच त्यांनी भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत देशात प्रथम क्रमांक मिळवले.
इंग्रजी भाष त्यांना संपूर्णपणे अवगत नव्हती, तरीही हार न मानता त्यांनी कठोर परिश्रम केले आणि 50 वी रँक मिळवत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली.