Sunil Balasaheb Dhumal
पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सीव्ही आनंद बोस यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे.
राज्यपालांनी दोनदा विनयभंग केल्याचा महिला कर्मचाऱ्याचा दावा आहे.
या प्रकरणी कोलकाता येथील हेअर स्ट्रीट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यानंतर पश्चिम बंगाल सरकार आणि राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून आला आहे.
या प्रकरणी पोलिसांचे तपास पथक तयार केले असून राजभवनातील सीसीटीव्ही तपासले जाणार आहेत.
राज्यपाल बोस यांनी विनयभंगाचे आरोप फेटाळले असून राजकीय हेतूने हे षडयंत्र रचल्याचे म्हटले आहे.
गंभीर आरोप झाले तरी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना घटनात्मक कर्तव्ये बजावताना न्यायालयात उत्तर देण्यापासून सूट आहे.
कलम ३६१ (२) मध्ये असे नमूद आहे की, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याविरुद्ध कायद्याच्या न्यायालयात फौजदारी खटला चालवला जाऊ शकत नाही.
पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पोलिस एफआयआर नोंदवून तपास करू शकतात.