Sanchaar Saathi App : देशात खळबळ उडवून देणारं काय आहे 'संचार साथी अ‍ॅप'?

Rashmi Mane

प्री-इंस्टॉल बंधनकारक

दूरसंचार विभागाने (DoT) मोठा निर्णय घेतला आहे. आता भारतातील प्रत्येक नवीन मोबाइल फोनमध्ये ‘संचार साथी’ अॅप प्री-इंस्टॉल असणे बंधनकारक असेल असा निर्णय काढण्यात आला होता.

अॅप डिलीट करता येणार नाही

मोबाईल सुरू करताच हे अॅप दिसणार डिलीट करता येणार नाही, ना डिसेबल करता येणार नाही.

जुन्या फोनचं काय?

जे फोन आधी विकले गेलेत, त्यामध्ये हे अॅप सॉफ्टवेअर अपडेटद्वारे उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजे देशातील सर्व फोनमध्ये हे अॅप अनिवार्य होणार आहे असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र...

निर्णय मागे

वाढत्या विरोधानंतर अखेर केंद्रीय टेलिकॉम मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करत माघार घेतली. त्यांनी सांगितले की संचार साथी अॅप अनिवार्य नसून हवे असल्यास ते मोबाईलवरून काढून टाकता येते.

‘संचार साथी’ म्हणजे काय?

हे सरकारचे सायबर सिक्युरिटी टूल आहे. 2023 मध्ये वेब पोर्टल म्हणून सुरुवात झाली आणि 17 जाने 2025 रोजी अॅप लाँच करण्यात आले. Android आणि iOS दोन्हीवर मोफत उपलब्ध.

अॅप काम कसं करतं?

अॅप मोबाईल नंबर, OTP आणि फोनचा IMEI वापरून तुमच्या डिव्हाइसला DoT च्या CEIR डेटाबेसशी जोडते. फोन वैध आहे की चोरीचा, ब्लॅकलिस्टेड आहे का – त्वरित माहिती मिळते.

महत्वाची फीचर्स

• चोरी/हरवलेला फोन ब्लॉक किंवा ट्रॅक
• तुमच्या नावावर किती SIM आहेत याची माहिती
• कोणते IMEI वैध किंवा ब्लॅकलिस्ट ते तपासता येते
• सेकंड-हँड फोन खरेदी करताना अत्यंत उपयोगी

फ्रॉड कॉल्सवर थेट रिपोर्ट

बँक अधिकारी बनून OTP मागणे, KYC अपडेटचा बहाणा, लॉटरी, फसवे कुरिअर कॉल, अशा फसवणुकीच्या नंबरची तक्रार थेट अॅपमधून करू शकता.

Next : आता फक्त 2 मिनिटात! असे शोधा मतदार यादीत आपले नाव आहे की नाही?

येथे क्लिक करा