Deepak Kulkarni
इराण-इस्रायल-अमेरिका यांच्यात पेटलेल्या युद्धामुळे महाराष्ट्रासह भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ज्यामुळे गॅस सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा आणि हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला आहे.
इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवले आहे, तर नेहमीचे सर्व खाद्यपदार्थ महागले आहेत.
गॅस टंचाई निर्माण झाल्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन गॅस बुकिंग सेवा बंद पडली असून ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतू भारतात सर्वाधिक एलपीजी गॅसचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या शहरात होतं, माहिती आहे...?
गुजरात राज्यातील जामनगर शहरात भारतात एलपीजी गॅसचे सर्वाधिक उत्पादन होते.
जामनगरमधील रिफायनरी संकुल जगातील सर्वात मोठे रिफायनरी संकुलपैकी एक आहे. या ठिकाणी कच्च्या तेलावर प्रक्रिया करून मोठ्या प्रमाणात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते.
जामनगरसह वडोदरा, मथुरा, पानिपत आणि हल्दिया येथेही रिफायनरीमध्येही मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅसची निर्मिती होते.
भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इंधनांपैकी एलपीजी हे एक आहे. घरांतील स्वयंपाक, उद्योग विश्व आणि वाहनांमध्ये पर्यायी इंधन म्हणून एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
सध्याच्या काळात भारताचा समावेश हा जागतिक पातळीवर एलपीजी गॅसचा वापर करणारा मोठ्या ग्राहकांपैकी एक ओळखला जातो. या देशात रोज लाखो कुटुंबे एलपीजी सिलिंडर वापर करतात.
भारत आपल्या गरजेच्या फक्त 40 % एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन करतो, तर उर्वरित गॅस हा आयात केला जातो.