सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्र सरकारने 13 IAS अधिकाऱ्यांच्या तडकीफडकी बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये एक नाव आहे श्वेता सिंघल यांचं.
राज्यपालांच्या सचिवपदी काम करणाऱ्या श्वेता सिंघल यांची अमरावती विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
2009 च्या बॅचच्या त्या अधिकारी आहेत.
सिंघल यांनी 24 एप्रिल 2017 ते 18 जानेवारी 2020 या कालावधीत सातारा येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार सांभाळला.
साताऱ्याच्या जिल्हाधिकारी असताना दुष्काळ, पूर परिस्थिती, विधानसभा निवडणुकीबरोबर लोकसभा निवडणुकीच्या कामात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
श्वेता सिंघल यांच्या मार्गदर्शनामुळे साताऱ्यात शासनाच्या विविध योजना राबवल्या गेल्या. 'जलयुक्त शिवार' ही योजना यशस्वीरित्या राबवून सातारा जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमाकांवर होता.
नवभारत ग्रुपच्यावतीने 'आयकॉनिक इन्सपायरेशनल वुमेन ऑफ नवभारत' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.