विठुरायाच्या कपाळावर काळा टिळा का? कारण ऐकून डोळे पाणावतील

Ganesh Sonawane

आषाढी वारीला शेकडो वर्षांची परंपरा असून लाखो वारकरी पंढरपूरला जातात. जितके भक्त विठुरायाला भेटण्यासाठी आतुर असतात तितकाच आतुर विठुराया देखील भक्तांना भेटण्यासाठी असतो.

Vitthal | Sarkarnama

विठुरायाच्या कपाळी एक चंदनाचा टिळा तुम्ही पाहिला असेल. या चंदनाच्या टिळ्यावर आणखी एक काळा टिळा लावला जातो.

Vitthal | Sarkarnama

परंतु हा काळा टिळा का लावला जातो हे अनेकांना माहित नाही. यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यातील एक कारण आज आपण पाहुया.

Vitthal | Sarkarnama

विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त पंढरपूरमध्ये येतात. ते रात्रभर तहान-भूक विसरुन दर्शनासाठी रांगेत उभे असतात. पण विठुराया असे म्हणतात की, मी लोकांच्या दर्शनासाठी येथे उभा आहे.

Vitthal | Sarkarnama

विठ्ठलाच्या म्हणण्यानुसार, मी भक्तांची प्रतीक्षा करतो पण ते माझी प्रतीक्षा करतात हे मला अजिबात पटत नाही. लाखो भाविक येत असल्याने दर्शनासाठी त्यांना रांगेत प्रतीक्षा करावी लागते.

Vitthal | Sarkarnama

भक्तांना तासंतास दर्शनासाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याचा अपराध नष्ट करण्यासाठी विठ्ठलाच्या भाळी चंदनाच्या टिळ्यावर हा काळा टिळा लावला जातो.

Vitthal | Sarkarnama

पंढरपूरच्या मंदिरात रात्री झाडू मारला जातो जिथे भक्तांची रांग असते तिथली माती जमा केली जाते. ती माती चाळून त्यामध्ये चंद्रभागेचे पाणी मिसळलं जातं. त्यात अबीराचे मिश्रण टाकून हा टिळा विठ्ठलाच्या कपाळावरती लावला जातो, अशी अख्यायिका आहे.

Vitthal | Sarkarnama

आपल्या भक्तांची काळजी करणारा आणि त्यांच्या पायाची माती कपाळावर लावून मिरवणारा सर्वांचा दयाळू विठ्ठल म्हणजे निव्वळ प्रेमाचा झरा आहे.

Vitthal | Sarkarnama

NEXT : लाडकी बहिणींसाठी खुशखबर! या स्टेप्सने घरबसल्या तपासा पैसे जमा झालेत की नाही

Mazi Ladki Bahin Yojana
येथे क्लिक करा