Deepak Kulkarni
संपूर्ण भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन उत्साह आणि अभिमानाने साजरा केला जातो.
प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस इतिहासातील एक सुवर्ण पान आहे, जो आपल्या स्वातंत्र्य सेनानींच्या त्याग,शौर्य,बलिदानाचं मूल्य आणि महत्त्व यांचं स्मरण करुन देतो.
भारतात 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहासाबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया.
15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावला आणि त्यांच्या ऐतिहासिक भाषणानं भारताच्या एका नवीन युगाची सुरुवात होता.
भारताचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माउंटबॅट यांनी ही तारीख निवडली होती. माउंटबॅटन यांनी ही तारीख निवडली कारण ती दुसऱ्या महायुद्धात जपानच्या शरणागतीचा दुसरा वर्धापन दिन होता.
जपानने मित्र राष्ट्रांसमोर 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि त्यावेळी आग्नेय आशियातील मित्रराष्ट्रांचे कमांडर माउंटबॅटन होते. त्याचमुळे त्यांनी ही एक तारीख महत्त्वाची मानली.
माउंटबॅटन यांनी जून 1947ं ला भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र होईल. ही तारीख निवडण्यात प्रशासकीय आणि राजकीय तयारीचाही समावेश होता. कारण ब्रिटिश सरकार शक्य तितक्या लवकर भारताला सत्ता हस्तांतरण करू इच्छित होते.
मोठ्या लढ्यानंतर 1947 मध्ये भारताचे भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशांमध्ये विभाजन झाले. 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारताला औपचारिकपणे स्वातंत्र्य मिळाले.